Friday, April 12, 2019

कडक उन्हाळा; काय करावे आणि काय करू नये?


आता उन्हाचे चांगलेच चटके बसू लागले आहेत. वाढलेल्या उष्णतेमुळे काही आजार डोके वर काढण्याची शक्यता असते. अशात आनंदी व निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात... 

📍 *काय करावे?* :

1. सकाळी दात घासल्यावर गायीच्या तुपाचे किंवा खोबरेल तेलाचे 2-2 थेंब नाकात घालावेत. यामुळे डोकं आणि डोळ्यांतील उष्णता शमते.

2. सूर्याच्या प्रखर उष्णतेपासून शरीराचं रक्षण करण्यासाठी कैरीचं पन्हं, लिंबू सरबत, जिऱ्याचं सरबत, शहाळ्याचं पाणी, फळांचा ताजा रस, दूध घालून केलेली तांदूळाची खीर, गुलकंद इत्यादी थंड पदार्थांचा आहारात समावेश करावा.

3. सैलसर सुती कपडे वापरावेत आणि केसांची स्वच्छता राखावी. प्लास्टिकची चप्पल वापरु नयेत.

4. कडक उन्हात जायचे असेल, तर पाणी पिऊन जावं. डोकं आणि डोळ्यांचं उन्हापासून रक्षण होण्यासाठी टोपी आणि गॉगलचा वापर करावा.

5. फ्रिज किंवा कूलर यांमधील थंड पाणी प्यायल्याने घसा, दात आणि आतडे यांवर दुष्परिणाम होतो. त्यामुळे साधं अथवा माठातील पाणी प्यावं.

6. जळवात (पायांना भेगा पडणे) आणि उष्णता यांचा त्रास होत असल्यास हातापायांना मेंदी लावावी.

📍 *काय करू नये?* :

1. लहान मुले व पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये.

2. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. विशेषतः दुपारी बारा ते साडेतीन या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे.

3. खमंग, कोरडं, शिळं, खारट, अती तिखट, मसालेदार आणि तळलेले पदार्थ, तसंच आमचूर, लोणचं, चिंच इत्यादी आंबट, कडू आणि तुरट पदार्थ खाणं टाळावं.

4. कोल्ड ड्रिंक्स, आईस्क्रीम, टिकण्यासाठी रसायने वापरलेले फळांचे डबाबंद ज्यूस यांचे सेवन टाळावं.

5. उष्ण वातावरणातून थंड वातावरणात आल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 10-15 मिनिटांनंतरच पाणी प्यावं.

6. अधिक व्यायाम, अधिक परिश्रम, अधिक उपवास, उन्हात फिरणं आणि तहान-भूक रोखून धरणे इत्यादी गोष्टी टाळाव्यात.

गुरुजी

शाळांना जर का शिक्षक लाभला नसता तर.... गणितचा भूगोल झाला असता. फळ्यावर जर खडूचा हात फिरवला नसता तर.... ABCD आणि बाराखडीचा अर्थच कळला न...