💫 विद्यार्थ्यांच्या आयुष्यातला एक मोठा टप्पा म्हणजे दहावी-बारावीची परीक्षा! या परीक्षा पास झाल्यावर पुढे काय करायचं, करिअरसाठी कोणतं क्षेत्र निवडायचं, याचा निर्णय सगळ्याच विद्यार्थ्यांना घ्यायचा असतो. हा निर्णय खूप महत्वाचा असतो कारण आपल्या आयुष्यातल्या बऱ्याच गोष्टी या निर्णयावर अवलंबून असतात आणि मुलांच्या करिअरबाबतीत निर्णय घेताना पालकांनी काही महत्वाच्या गोष्टींकडे लक्ष देणे फार गरजेचे ठरते.
👉 *पालकांनी या गोष्टी नक्की लक्षात ठेवाव्यात :*
▪ तुमची एखादी इच्छा अपुरी राहिली म्हणून तुमच्या पाल्याला तसे किंवा तेच करायला भाग पाडू नका. मुलांच्या कलाने घ्या, त्यांना कशात रस आहे ते ओळख आणि त्यांना योग्य मार्ग दाखवा.
▪ दिवसेंदिवस प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा वाढती आहे, त्यामुळे मुलांचा एखाद्या विषयातला रस आणि त्यात करिअर केल्याने कितपत पैसे मिळू शकतो याचा विचार अवश्य व्हायला हवा.
▪ मुलांना निर्णय घेण्यात मदत करतेवेळी पुढच्या किमान पाच ते दहा वर्षांचा विचार करून मार्ग दाखवा.
▪ सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुलांना धीर द्या, ते एका नव्या जगात प्रवेश करत असताना त्यांना पालकांनी मदत करणे महत्वाचे ठरते.
आवडल्यास रिप्लाय नक्की द्या
No comments:
Post a Comment